Oct 20, 2018

HOME ASSIGNMENT NO. 05

प्र . १ ला. महात्मा गांधींच्या दांडी संचलनाची तुलना नेपोलियन एल्बाहून परतल्यावर पॅरिस कडे केलेल्या                            संचलनाशी केली होती ?

प्र. २ रा . ........ यांनी मिठाचा कायदा मोडण्यासाठी १९३० मदे तंजावर किनाऱ्यावर अभियान उभे केले ?

प्र.३ रा. १९३२ मध्ये म. गांधींनी आमरण उपोषणास सुरवात केली त्यामागील प्रमुख कारण कोणते होते ?

प्र. ४ था. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे लाहोर अधिवेशन १९२९ ऐतिहासिक होण्याचे कारण सांगा .

प्र.५ वा. अनटू दि लास्ट (जॉन रस्किन )या पुस्तकात माझ्या महत्वाच्या श्रद्धा प्रतिबिंबित झाल्या आहेत असे गांधीजी म्हणत                      पुस्तकाने  त्यांचे आयुष्य बदलून टाकले. त्या पुस्तकातील कोणत्या संदेशांची गांधीजींच्या आयुष्यात बदल              घडविला?

प्र.६ वा. खेड्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने गांधीजींनी सत्याग्रह का अवलंबिला ?

प्र. ७ वा. चंपारण्य च्या अभ्यासावेळी............. हे गांधीजींचे सहकारी होते ? हे शिक्षक होते.

प्र. ८ वा. विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण होते ?

प्र. ९ वा. .......... हे तिसरे वैयक्तिक सत्याग्रही होते .

प्र. १० वा. अहमदाबाद सूतगिरणी कामगार असोसिएशन ची स्थापना कोणी केली ?

प्र.११ वा. मौलाना आझाद( स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री ) यांनी चालविलेले नियतकालिक कोणते ?

प्र.१२ वा. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीच्या प्रारंभाशी ......... हे ठिकाण जोडलेले आहे .

प्र. १३ वा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या १९२९ च्या  लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात                    आला.त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण?

प्र. १४ वा. काँग्रेस च्या कार्यकारी समितीने काँग्रेस च्या कुठल्या अधिवेशनात सविनय कायदेभंग राबविण्यास                        परवानगी दिली ?

प्र. १५ वा. चौरीचौरा हिंसाचार , मोर्ले मिंटो सुधारणा कायदा , दांडी यात्रा , मॉंटेग्यू चॅम्सफर्ड कायदा या घटनांचा                   योग्य कालानुक्रम लावा. 

No comments:

Post a Comment